Breaking News
Ahilyanagar Fake Note Crime |राहुरीत बनावट नोटा प्रकरण उघडकीस : 66 लाखांसह तिघांना अटक.. Koparagoan | कोपरगावात बिबट्याच्या जबड्यातून आजोबांनी वाचवला चार वर्षांचा नातू! Shaheed Sandip Gaikar | शहीद संदीप गायकर यांना अखेरचा निरोप; ब्राह्मणवाडा गावात शोकसागर पाकिस्तानप्रेमींना दहशतवाद्यांच्या हवाली करा; शिर्डीत मंत्री विखेंचा स्फोटक घणाघात Shirdi | शिर्डीत बनावट पोलीस अधिकारी अटकेत, श्रीरामपुरचा जग्गू इरानी अखेर धरला Shirdi Trust Update | शिर्डी साई संस्थानवर प्रशासकीय समितीची स्थापना Shirdi News | शिर्डीत देणगीदारांसाठी नवीन धोरण, व्हीआयपी रकमेची मर्यादा घटवली शिर्डीतील गुटखा किंगला राजकीय वरदहस्त? चार लाखांचा गुटखा जप्त.. Ramgiri Maharaj | सर्वधर्मसमभावच्या नावाखाली दहशतवाद्यांना संरक्षण? रामगिरी महाराजांचे वक्तव्य Maharashtra Alert | पहलगाम हल्ल्यानंतर राज्यातील पर्यटन स्थळांवर अलर्ट? चंद्रशेखर बावनकुळे शिर्डी परिसरात ऑनलाइन वेश्या व्यवसाय? पोलिसांकडून पर्दाफाश पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड सफुल्ला खालीद कोण? Shirdi Ambani News | आई नंतर पुत्र आकाश अंबानीं साईचरणी लीन
25.3 C
Maharashtra
Tuesday, July 1, 2025

Raigad Bharat Gogawale: जो भावाचा नाही, तो आमचा काय? भरतशेठ गोगावले बरसले

- Advertisement -

Raigad Politics: रायगडच्या पालक मंत्रिपदाचा मुद्दा सध्या चांगलाच तापला आहे, रायगडच्या पालकमंत्री म्हणून आदिती तटकरे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली होती. मात्र त्यानंतर नाराजीनाट्य सुरू झालं. मंत्री भरत गोगावले आणि दादा भुसे यांना पालकमंत्रिपद न मिळाल्यानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची चर्चा देखील सुरू होती. त्यानंतर रायगडच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती देण्यात आली.

मात्र पूर्वी ज्यांच्या नावाची घोषणा पालकमंत्री म्हणून झाली आहे, तेच प्रजासत्ताक दिनी झेंडावंदन करतील असं ठरलं होतं. त्यामुळे आज आदिती तटकरे यांनी झेंडावंदन केलं.  यावर बोलताना आता भरत गोगावले यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते सुनीत तटकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

नेमकं काय म्हणाले भरत गोगावले? 

मंत्री म्हणून त्यांनी झेंडावंदन केलं, आम्ही त्याबद्दल काही बोलणार नाही. जर मी काही चुकीचं काम केलं असेल तर मी राजीनामा द्यायला तयार आहे, असं भरत गोगावले यांनी म्हटलं आहे. एवढंच नाही तर यावेळी बोलताना त्यांनी सुनील तटकरे यांच्यावर निशाणा साधला आहे, तटकरे यांचं नाव न घेता हल्लाबोल केला. जो भावाचा नाही झाला तो आमचा काय होणार, आव्हान स्किकारून चालतो तोच यशस्वी होतो. मंगळवारी आम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहोत, काही गोष्टी या गनिमी काव्याच्या असतात, असं गोगावले यांनी म्हटलं आहे.

दरम्यान यावेळी बोलताना आमदार महेंद्र दळवी यांनी देखील आदिती तटकरे आणि सुनील तटकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. महाविकास आघाडीच्या काळात आमच्या जिल्ह्याच्या पालकमंत्री या आदिती तटकरे होत्या,  त्यांना वैतागून आम्ही रायगड जिल्ह्यातल्या तीन आमदारांनी उठाव केला, आणि त्यानंतर गुवाहाटीचं लोण संपूर्ण राज्यात पसरलं. त्यानंतर राज्यात सत्ता परिवर्तन झालं. पण इतकं होऊन सुद्धा सुनील तटकरे यांची महायुतीच्या सरकारमध्ये मागच्या दाराने एन्ट्री झालीच,  आणि पुन्हा एकदा त्यांची जादू चालली. त्यांनी मुलीला मंत्री बनवलं पण पालकमंत्री हे उदय सामंत होते.

आता पुन्हा दुसऱ्यांदा महायुतीची सत्ता आली यावेळेस सुनील तटकरे यांनी जादू केली आणि आपल्या मुलीला पालकमंत्रिपद दिलं. त्यांच्याकडे काय जादू आहे ते माहित नाही. आम्ही पालकमंत्रिपदासाठी भरत गोगावले यांचं नाव फायनल केलं होतं, पण ते रात्रीतून कसं बदललं असा प्रश्न दळवी यांनी उपस्थित केला आहे.

- Advertisement -

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
315,632SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles