Breaking News
Ahilyanagar Fake Note Crime |राहुरीत बनावट नोटा प्रकरण उघडकीस : 66 लाखांसह तिघांना अटक.. Koparagoan | कोपरगावात बिबट्याच्या जबड्यातून आजोबांनी वाचवला चार वर्षांचा नातू! Shaheed Sandip Gaikar | शहीद संदीप गायकर यांना अखेरचा निरोप; ब्राह्मणवाडा गावात शोकसागर पाकिस्तानप्रेमींना दहशतवाद्यांच्या हवाली करा; शिर्डीत मंत्री विखेंचा स्फोटक घणाघात Shirdi | शिर्डीत बनावट पोलीस अधिकारी अटकेत, श्रीरामपुरचा जग्गू इरानी अखेर धरला Shirdi Trust Update | शिर्डी साई संस्थानवर प्रशासकीय समितीची स्थापना Shirdi News | शिर्डीत देणगीदारांसाठी नवीन धोरण, व्हीआयपी रकमेची मर्यादा घटवली शिर्डीतील गुटखा किंगला राजकीय वरदहस्त? चार लाखांचा गुटखा जप्त.. Ramgiri Maharaj | सर्वधर्मसमभावच्या नावाखाली दहशतवाद्यांना संरक्षण? रामगिरी महाराजांचे वक्तव्य Maharashtra Alert | पहलगाम हल्ल्यानंतर राज्यातील पर्यटन स्थळांवर अलर्ट? चंद्रशेखर बावनकुळे शिर्डी परिसरात ऑनलाइन वेश्या व्यवसाय? पोलिसांकडून पर्दाफाश पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड सफुल्ला खालीद कोण? Shirdi Ambani News | आई नंतर पुत्र आकाश अंबानीं साईचरणी लीन राजू शेट्टींचा संतप्त हल्लाबोल: “शेतकऱ्यांना फसवणाऱ्या सरकारच्या मंत्र्यांना तुडवा!”
28.4 C
Maharashtra
Monday, June 30, 2025

Ramgiri Maharaj | सर्वधर्मसमभावच्या नावाखाली दहशतवाद्यांना संरक्षण? रामगिरी महाराजांचे वक्तव्य

- Advertisement -

शिर्डी: काश्मीरमधील पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यावर प्रतिक्रिया देताना, संत समाजाचे मार्गदर्शक महंत रामगिरी महाराज यांनी कठोर शब्दांत या हल्ल्याचा निषेध केला आहे. हा हल्ला इस्लामिक आतंकवादाच्या जिहादी मानसिकतेतून झाल्याचे त्यांनी स्पष्टपणे म्हटले.

रामगिरी महाराज म्हणाले, “आम्ही वेगळे आहोत, काफिरांना जगण्याचा अधिकार नाही, अशा विकृत शिकवणुकीतूनच असे भयावह हल्ले घडत आहेत. जिहादी मानसिकतेच्या लोकांपासून आपण सतर्क राहायला हवे. हे लोक कधीही सुधारणार नाहीत.”

मोदी सरकारचे अभिनंदन, घुसखोरांवर कारवाईची मागणी

महंत रामगिरी महाराजांनी मोदी सरकारच्या भूमिकेचे स्वागत करत म्हटले की, “बांगलादेशी, पाकिस्तानी आणि रोहिंग्या घुसखोरांविरुद्ध कठोर पावले उचलण्याची सुरुवात केल्याबद्दल आम्ही केंद्र सरकारचे आभार मानतो.” त्यांनी स्पष्ट शब्दांत मागणी केली की, “फक्त घुसखोरच नव्हे, तर अशा घुसखोरांना मदत करणाऱ्या व्यक्तींवरही कठोर कारवाई व्हावी.”

‘सर्वधर्मसमभाव’चा गैरवापर टाळा – रामगिरी महाराजांचा इशारा

रामगिरी महाराजांनी सर्वधर्मसमभावाच्या नावाखाली दहशतवाद्यांना संरक्षण देण्याचा प्रकार काही राजकीय लोकांकडून होत असल्याचा आरोप केला. “भारत हा सर्व धर्मांचा सन्मान करणारा देश आहे. पण काही लोक सर्वधर्मसमभावाचा चुकीचा वापर करत आहे. एकीकडे सर्वधर्मसमभावाची गोड गोष्ट सांगायची आणि दुसरीकडे आतंकवाद्यांना वाचवण्याचा प्रयत्न करायचा, हे अतिशय धोकादायक आहे,” असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.

हिंदू समाजाला जागृत होण्याचे आवाहन

यावेळी रामगिरी महाराजांनी संपूर्ण हिंदू समाजाला जागृत होण्याचे आणि झोप मोडण्याचे आवाहन केले. “हिंदू समाजाने आता सावध होऊन आपल्या अस्तित्वाच्या रक्षणासाठी सजग राहायला हवे,” असे आवाहन त्यांनी केले.

- Advertisement -

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
315,632SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles